Friday, August 28, 2009

आठवण...

आठवतो आज मला तो समुद्रकिनारा
ती नारळाची बने आणि बेभान वारा

आठवतात ती प्रेमाची गाणी
कोवळ्या शहाळ्याचे थंडगार पाणी

आठवतात त्या उसळणाऱ्या लाटा
ओहोटीनंतरच्या नागमोडी वाटा

आठवते हातात घालून तास न तास फिरणे
कंटाळा आल्यावर दगडांवर बसणे

आठवतात त्या दगडांपाठच्या घट्ट घट्ट मिठया
एकमेकांना चोरून लिहीलेल्या प्रेमाच्या चिठ्ठया

आठवते ती नरम गुलाबी ओठांची गोडी
दूरवर संथपणे जाणारी होडी

आठवतात ती नावं... ऒल्या वाळूत लिहीलेली
आणी ती संध्या तुझ्यासोबत पाहिलेली

आठवतेस मग तू... जिला सर्वस्व अर्पिले
ते सारे प्रेमबंध जिने क्षणात तोडून दिले...

No comments:

Post a Comment