Thursday, September 25, 2014

Shayarana...

11.    Sang jaroori hain badal ka beshaq...
 Warna sirf bijaliyon se barish ka sama nahi banta...

22.  Waqt aur aashiq ek hi mizaz ke hain..
Dosti geheri hain samajh ke aage badho to dono zindagi nark bana dete hain...

33.  Mausiki to bass bahana hain...
Ham to isliye peete hain ki koi hamdard mil jaye

44.  Mahaknedo hazaron phoolon ki kyariya...
Chehekno do lakon panchiyon ki kilkariyaan..
Ye sab bhi raas na aaye bimar-e-ishq dil ko..
Hamein rizaa paaye so bass yaron ki yariyaan

55.  Dil to hain masoom.. Kamjargh dosti ko ishq samajh baitha....
Warna ham bhi hote kahi kaamyabi ke shikhar pe...

66.  Kabhi hua karta tha ye hunar-e-khaas...
Aajkal toote dil bhi paida kiya karte hain kayi shayar galiyon me...

77.  Likhkte likhte toot jaaye yah ungliyaan to bhi kya....
Hamari dastaan bayaan ho paaye yahi masoom si koshish rahegi...

88.  Mohobbat ko kar na badnaam ae nadaan...
Is sajish ko samajh paaye itna kamjargh tera dil nahi...

99.  Hum to the anjaan maqsad-e-zindagi se...
Aapka hone me hi hamari shaqsiyat bani rahegi...

Sunday, December 5, 2010

ही शाळा आमुची

ही शाळा आमुची अभिमानाचा एक सोहळा,
या मातीमधल्या जल्लोषाचा गंध आगळा...
हा स्पर्श खडूचा घेऊन येतो आठवणींच्या सरी
ही शाळेमधली घंटा  अजूनी निनादते आमुच्या अंतरी
गुणवंतांची शाळा, यशवंतांची नगरी
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

या बाकानवरती स्पर्धा केली अनाम वाऱ्यांनी,
अन यश-शिखरांचे  किल्ले काबीज केले साऱ्यांनी...
ती गुरुशिकवणी गुरुवाणी कोरून काळजात, 
"निर्भीड लढा दे स्पर्धेशी, कर संकटावरी मात..."

"जा सामोरे वादळास, उत्तुंग पायरी चढा,
या यशोन्नती क्षितीजात मोकळ्या निळ्या आभाळी उडा..."
या शाळेने उघडून दिली गुरुकिल्ली यशाची,
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

येथेच घडवली शाळेने यशसुमनांची गाथा,
हा प्रणाम आमुचा लाख लाखदा तुम्हास हो गुरुनाथा...
तुमच्याच घडीने शिकलो आम्ही जगण्याची रीत,
मायेचा अलगद एक धपाटा स्मरे अजून पाठीत... 

जो दिला मंत्र तुम्ही आम्हा, अजूनही गुंजतो नित्य कानी,
अन भाग्यशाली जाहलो, लाभता मंगल तव गुरुवाणी...
ही प्रचंड इच्छाशक्ती आम्हा सदा देत असे साथ,
'आयुष्याचे व्हावे राजे', हे ध्येय असे आत...
आमुच्याशी स्पर्धा करण्याची आहे हिम्मत कुणाची...???
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

ही शाळा आमुची अभिमानाचा एक सोहळा,
या मातीमधल्या जल्लोषाचा गंध आगळा...
हा स्पर्श खडूचा घेऊन येतो आठवणींच्या सरी
ही शाळेमधली घंटा  अजूनी निनादते आमुच्या अंतरी
गुणवंतांची शाळा, यशवंतांची नगरी
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!

Saturday, September 19, 2009

प्रेम म्हणजे...

प्रेम म्हणजे काय असतं ते तुम्ही मला विचारा
वेड लागलेल्या मनाचा हा खेळ आहे सारा

नजरेला नजर मिळते, चेहरा हृदयात सामावतो
प्रेमात शहाणा माणूसही आपली बुद्धी गमावतो

रात्रंदिवस सतावत राहते मग तिचीच आठवण
तिच्या एका झलकेसाठी आतुर होते मन

तिच्याच विचारांमध्ये हरखून मरते तहानभूख
प्रेम कराणार्‍यांपासून दूर पळते सुख

उघड्या डोळ्यांनीही आपण स्वप्ने पाहू लागतो
तिच्याच स्मृतींना जवळ करून आपण राहू लागतो

यातून बाहेर पडायचं तर पडताही येतं नाही
तिला समोर घेउन सगळं सांगताही येतं नाही

तिच्याशिवाय आपले जीवनचक्र अडून पडते
हसत हसत नकळतंच आपले मन रडते

खुपकाही करून बसतो आपण प्रेमासाठी
तरीही तिचा नकार लिहिला जातो आपल्या माथी

हृदयाचे मग होऊन जातात शेकडो तुकडे
जीवनाचे सरळ रस्तेही होतात वेडे-वाकडे

प्रेमात वाट्याला येतो शेवटी प्रेमभंग
नकोसे वाटू लागतात सातही रंग

प्रेम म्हणजे आहे वाळवंटातले मृगजळ
प्रेम आहे खोल दरी जिचा दिसत नाही तळ
म्हणून कधी करू नये प्रेमाला जवळ
नाहीतर जीवनात येतेच दुःखांचे वादळ

नुकतेच कुठे...

नुकतेच कुठे येऊन गेले होते मोठे वादळ
नुकतीच कुठे स्थिरावली होती हवेतली धूळ

नुकताच कुठे टाकला होता सुटकेचा निश्वास
नुकताच कुठे लागला होता भविष्याचा ध्यास

नुकतेच कुठे आले होते होठांवरती हसू
नुकताच कुठे लागला होता आशेचा सुर्य दिसू

नुकतेच कुठे उभारले होते विश्व पुन्हा सगळे
नुकतेच कुठे बहरत होते ऋतू आगळे-वेगळे

नुकतेच कुठे मनाला वाटू लागले होते बरे
नुकतेच पुन्हा वाहू लागले सोसाट्याचे वारे

आता कळेल तुला...

आता कळेल तुला, की मन मोडल्यावर कसं वाटतं
आता कळेल तुला, की नातं तोडल्यावर कसं वाटतं

स्वप्नांवर सत्याचा दगड पडला, की ते कसे खळकन फुटून जातात
मनात वाहणार्‍या भावनांच्या नद्या कशा झटकन आटून जातात

अश्रूंचा पूर पापण्यांचा बांध तोडून कसा वाहतो
अशावेळी धीरही कसा आपली साथ सोडून जातो

जीवनभर वैफल्य का माथी लिहीलं जातं
आकांक्षांना पूर्ण होताना स्वप्नांतचं का पाहीलं जातं

भर पावसांतही मनं का जळत असतं
वेड्या आशेमगे मनं का पळत असतं

डोळ्यांत पाणी असलं तरी का मनात असतो अंगार
उध्वस्त, उधळत्या विचारांवर का मन होते स्वार

दुनियेभरची दुःखं झोळीत टाकून माणसं कशी होतात वेगळी
दैव कशी खेळतो भावनांशी खेळी

मनात खोलवर जाऊन कसा रुतून बसतो सल
आयुष्यभर कसा साचून राहतो आपल्याभोवती दुःखांचा चिखल
उधाणलेलं मन
करील किती जतन
समजाऊ कसं पण... आता माझ्याकडेच राहायचं

क्षुब्ध, अशांत आत्मा
मागी सर्वांचा खात्मा
का करील तो तमा... कसं जगात वागायचं

सुन्न झालेली मती
वाटे आपुलकीची भीती
सांगू मी किती... नाही भावनेत वाहायचं

अधीर माझे डोळे
झाले कडांतून ओले
आसवांतून ते बोले... कधीतरी परतूनी यायचं

Monday, August 31, 2009

नेहमीसारखाच त्या दिवशी मी बाजारात हिंडत होतो
चार-आठ आणे वाचवायला वाद घालत होतो

इतक्यात एका ठेल्यापाशी "ती" मला दिसली
माझ्याकडे पाहून ती ओळख दाखवून हसली

लाल साडी, लाल पर्स, डोळ्यांवर काळा गॉगल
हीच नव्हे का ती कॉलेजमधली माझी "क्यूट गर्ल"!!

रोज लपून छपून आम्ही एकमेकांना पहायचो
मित्रांनी चिडवल्यावर मी चक्क लाजायचो

काहीतरी होईल अशी मला होती खात्री
नकार देईल ती अशी वाटायची पण भीती

कॉलेज पटकन संपले आणी तो प्रसंग टळला
स्वतःचे भविष्य घडवण्याकडे माझा मार्ग वळला

आणी आज अचानक ती पुन्हा माझ्यासमोर आली
अवघडल्यासारखं मी हसताच तिचीही खात्री झाली

"काय रे, कसा आहेस, कसं काय धंदापाणी??
ओळखलास ना मला, मी तर मैत्रीण जुनी...

कॉलेजमध्ये नाही का आपण कित्ती मजा करायचो
एकमेकांना कसं आपण लपूनछ्पून बघायचो..!!!

पण तू कसला भित्रा, मला बोलला नाहीस काही
तुला इंटरेस्ट नसेल म्हणून गप्प राहिले मीहि

परवा तुझा तो मित्र शाम भेटला होता
चौपाटीवर पठ्ठ्या बायकोला फिरवत होता

त्यानेच मला तुझा हा सर्व किस्सा सांगितला
मला तर हे सगळं ऐकून धक्का बसला

गप्प राहिलो नसतो तेव्हा तर बरं झालं असतं
कॉलेज संपल्याबरोबर आपण लग्न केलं असतं

पण अजूनही काही उशीर झाला नाही
तू असशील तयार, तर तयार आहे मीहि..."

अचानक बोलता बोलता ती पट्कन थांबली
माझ्या पाठच्या स्त्रीकडे पाहून परत बोलू लागली

"ही कोण बाई मघापासून इथे उभी आहे?
मी आल्यापासून मला खुन्नस देते आहे..."

मी काही बोलणार तोच स्त्री बोलू लागली "ती"
"तुम्हाला माहित नसेल, पण हे आहेत माझे पती!

तुम्ही असं अचानक भेटला ते बरं झालं,
नाहितर ह्यांच ’हे’ प्रकरण मला कधी कळलंच नसतं..

बरं होईल जर आता निघाल तुम्ही..."
घरी गेल्यावर खैर नाही, म्हणून काळजीत पडलो मी...