Saturday, September 19, 2009

आता कळेल तुला...

आता कळेल तुला, की मन मोडल्यावर कसं वाटतं
आता कळेल तुला, की नातं तोडल्यावर कसं वाटतं

स्वप्नांवर सत्याचा दगड पडला, की ते कसे खळकन फुटून जातात
मनात वाहणार्‍या भावनांच्या नद्या कशा झटकन आटून जातात

अश्रूंचा पूर पापण्यांचा बांध तोडून कसा वाहतो
अशावेळी धीरही कसा आपली साथ सोडून जातो

जीवनभर वैफल्य का माथी लिहीलं जातं
आकांक्षांना पूर्ण होताना स्वप्नांतचं का पाहीलं जातं

भर पावसांतही मनं का जळत असतं
वेड्या आशेमगे मनं का पळत असतं

डोळ्यांत पाणी असलं तरी का मनात असतो अंगार
उध्वस्त, उधळत्या विचारांवर का मन होते स्वार

दुनियेभरची दुःखं झोळीत टाकून माणसं कशी होतात वेगळी
दैव कशी खेळतो भावनांशी खेळी

मनात खोलवर जाऊन कसा रुतून बसतो सल
आयुष्यभर कसा साचून राहतो आपल्याभोवती दुःखांचा चिखल

No comments:

Post a Comment