उधाणलेलं मन
करील किती जतन
समजाऊ कसं पण... आता माझ्याकडेच राहायचं
क्षुब्ध, अशांत आत्मा
मागी सर्वांचा खात्मा
का करील तो तमा... कसं जगात वागायचं
सुन्न झालेली मती
वाटे आपुलकीची भीती
सांगू मी किती... नाही भावनेत वाहायचं
अधीर माझे डोळे
झाले कडांतून ओले
आसवांतून ते बोले... कधीतरी परतूनी यायचं
Saturday, September 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment