Saturday, September 19, 2009

उधाणलेलं मन
करील किती जतन
समजाऊ कसं पण... आता माझ्याकडेच राहायचं

क्षुब्ध, अशांत आत्मा
मागी सर्वांचा खात्मा
का करील तो तमा... कसं जगात वागायचं

सुन्न झालेली मती
वाटे आपुलकीची भीती
सांगू मी किती... नाही भावनेत वाहायचं

अधीर माझे डोळे
झाले कडांतून ओले
आसवांतून ते बोले... कधीतरी परतूनी यायचं

No comments:

Post a Comment